फडणवीसांचा एक कॉल आणि पांच मिनटात टेंडर रद्द !
मीरा भाईंदर: भाईंदरच्या उत्तन परिसरत एका शासकीय जमिनीवर प्रस्तावित कत्तलखाना उभारण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेने नुकतीच काढलेली निविदा अखेर महापालिका आयुक्तांनी रद्द केली. भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले की, सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि अवघ्या ५ मिनिटांत महापालिका आयुक्तांनी निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, सोमवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निविदा रद्द केल्याचे श्रेय विद्यमान आमदार गीता जैनही घेताना दिसली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून ही माहिती दिली, मात्र पोस्टमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केलेला नाही.
कत्तलखान्याची संपूर्ण निविदा प्रक्रिया आमदार गीता जैन यांच्या संगनमताने सुरू झाल्याचा दावा मेहता यांनी केला आहे. मेहता म्हणाले की, राज्य सरकारने कत्तलखान्यासाठी एक महिन्यापूर्वी 5 सप्टेंबर रोजी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला. आमदार गीता जैन यांना राज्य सरकारने महिनाभरापूर्वी जारी केलेल्या शासन निर्णयाची माहिती नव्हती, असे म्हणायचे आहे का?
तांत्रिक मुद्द्यावरून जैन यांना लक्ष्य केले
मेहता यांनी 6 ऑक्टोबरला कत्तलखान्याविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आमदार गीता जैन यांनी 4 ऑक्टोबरचा पत्र बाहेर काढले. यातही तांत्रिक चूक शोधून मेहता यांनी गीता जैन यांच्यावर निशाणा साधला आहे. ४ ऑक्टोबरला पालिका बंद झाल्यानंतर सायंकाळी ६.५५ वाजता कत्तलखान्याची निविदा वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजेच आमदार गीता जैन यांना कत्तलखान्याचे टेंडर निघणार आहे हे आधीच माहीत होते, त्यामुळे त्यांनी 4 तारखेला अगोदरच पत्र दिले, आता पालिका बंद होण्याआधीच त्यांनी पत्र दिले असेल, ही स्वाभाविक गोष्ट आहे, मेहता म्हणाले.
आमदारांवर 20 टक्का कमिशनचा आरोप
मेहता यांनी आमदार गीता जैन यांच्यावर टेंडरमध्ये 20 टक्का कमिशनचा आरोप ही केला आहे. सदर कत्तलखान्याची निविदा ही आमदार गीता जैन यांची सुनियोजित प्लान असल्याचे ते म्हणाले. आम्ही विरोध केला नसता तर त्यांना २० टक्का कमिशन मिळाले असते. आता निविदाच रद्द झाल्यामुळे ती त्याचे श्रेय घेण्यापासून मागे हटत नाही.
.jpg)


Comments
Post a Comment